Tuesday, September 26, 2017

Coordination Committee of Farmers Organisations Calls For Massive Peasant Rallies On October 20

Today September 26, a massive convention of thousands of farmers was held at Jalgaon by the Coordination Committee of Farmers Organisations in Maharashtra. It gave a clarion call for further struggle against the state government's betrayal of its own assurance of a complete loan waiver, for the implementation of the Swaminathan Commission, for pension at Rs 5000 per month for poor peasants and agricultural workers, against arbitrary and unjust land acquisition, etc. The convention gave a call to hold massive peasant (Baliraja) rallies at every district and tehsil centre in Maharashtra on October 20, which is Balipratipada day in Diwali. These state-wide rallies of thousands of peasants each will demand that since the policies of the BJP state government are directly responsible for the rising spate of suicides of debt-ridden peasants, cases under IPC section 302 (murder), 306 (abetment to suicide) and 420 (cheating) must be instituted against it. It may be recalled that on August 14, 2017, over two lakh peasants in the state had blocked all national and state highways in more than 200 centres in 31 districts in Maharashtra. The October 20 actions will also elicit a similarly massive response. Prominent Kisan leaders like Raju Shetty MP, Bachhu Kadu MLA, Raghunathdada Patil, Baba Adhav, Dr Ashok Dhawale, Dr Ajit Nawale, Namdev Gavde, Pratibha Shinde, Kishor Dhamale, Sushila Morale, Ganesh Jagtap, Karan Gaikar and others addressed this convention. This convention has also given its full support to the 15-day old joint statewide strike of Anganwadi workers that is now being valiantly fought for their just demands.

-Ashok Dhawale










शेतकरी प्रश्नी २० नोव्हेंबर रोजी संसदेला महाघेराव ! किसान सभेच्या नेतृत्वाखाली लाखों शेतकरी सहभागी होणार !

शेतकरी कर्जमुक्ती, शेतीमालाला रास्त भाव व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने २० नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे देशव्यापी भव्य संसद घेरावची हाक दिली आहे. राष्ट्रीय स्तरावरील दीडशेहून अधिक शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी होत आहेत. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने देशभरातील २५ राज्यांमधून लाखों शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. किसान सभेच्या वतीने महाराष्ट्रात आंदोलनाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.

अखिल भारतीय किसान सभेचे ३४वे राष्ट्रीय अधिवेशन ३ ते ६ ऑक्टोबर २०१७ रोजी हरियाना येथील हिस्सार शहरात संपन्न होत असून या अधिवेशनात २० नोव्हेम्बरच्या आंदोलनाची जोरदार तयारी करण्यात येणार आहे. चार दिवस चालणा-या या अधिवेशनात देशभरातील २५ राज्यामधून सुमारे १००० प्रमुख शेतकरी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. शेतकरी नेते माजी आमदार आमरा राम, माजी खासदार हनन मोल्ला, माजी खासदार एस. आर. पिल्ले, माजी मंत्री डॉ. सूर्यकांत मिश्रा, खासदार जितेंद्र चौधरी, डॉ.अशोक ढवळे, एन. के. शुक्ला, विजू कृष्णन, माजी आमदार के. बालकृष्णन, माजी आमदार पी. कृष्ण प्रसाद इत्यादी अधिवेशनास संबोधित करणार आहेत. महाराष्ट्रातून आमदार जे. पी. गावीत, किसन गुजर, डॉ.अजित नवले, दादा रायपुरे, अर्जुन आडे, उमेश देशमुख, बारक्या मांगात आदी २५ प्रतिनिधी अधिवेशनात सहभागी होत आहेत. समन्वय समितीत सहभागी इतर संघटनांनीही आपल्या स्तरावर आंदोलनाची जोरदार तयारी सुरू केली आहे.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के भावाची हमी द्या, शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्त करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, कसत असलेल्या जमिनी कसणारांच्या नांवे करा, शेतक-यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्याचे कारस्थान थांबवा, शेतक-यांचे संपूर्ण वीज बिल माफ करा, शेतीला मोफत वीज द्या, शेतक-यांची भाकड जनावरे सरकारने खरेदी करा व त्यांचा सांभाळ करा, शेतीमालावरील निर्यात बंदी उठवा, गाईच्या दुधाला किमान ५० रुपये व म्हशीच्या दुधाला ६५ रुपये हमी भाव द्या, शेतक-यांना पीक विम्यासह मोफत जीवन व आरोग्य विमा लागू करा, शेतक-यांच्या पोरांच्या शिक्षण व रोजगारातील समस्या सोडवा, शेतक-यांना वयाच्या ६० वर्षानंतर किमान ५००० रुपये पेंशन सुरू करा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने महाराष्ट्रातून हजारो शेतकरी त्यात सहभागी होणार आहेत. आंदोलनाच्या जनजागृतीसाठी किसान सभेच्या वतीने महाराष्ट्र स्तरावर राज्यव्यापी मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्यभरात २४ जिल्ह्यामध्ये किसान सभेच्या जिल्हा शाखांच्या वतीने होणा-या या मोहिमेत जिल्हा स्तरावर व्यापक सभांचे आयोजन करण्यात येत आहे. किसान सभेचे सर्व राज्यस्तरीय नेते या मोहिमेचे नेतृत्व करीत आहेत.

डॉ.अशोक ढवळे

केंद्रीय सहसचिव, अखिल भारतीय किसान सभा